Satbara boja now Online: वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे किंवा कमी करणे आता ऑनलाईन सुरू.

Satbara boja now Online: वारस नोंदी. मयताचे नाव कमी करणे किंवा बोजा चढविणे,satbara Land record कमी करणे अशा स्वरुपाच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, ही कामे देखील केवळ 25 रुपयांमध्ये महा ई सेवा केंद्र, सेतू आणि आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करता येणे आता शक्य आहे. सरकारने या संदर्भात एक महत्त्वाचा शासननिर्णय जाहीर केला आहे आणि सर्व सामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

वारस नोंद ऑनलाईन करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास काय करावे?

ग्रामिण भागात शेतजमीन ही कुटुंबातील कर्त्यापुरुषाच्या किंवा वयाने मोठ्या व्यक्तीच्या नावे असते. अशावेळी शेतजमीन ज्याच्या नावावर आहे  त्याचा अचानक मृत्यू झाल्यास वारसांनी जमिनीचे हक्क मिळावे यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत वारस नोंदीसाठी शासनाकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या वारस नोंद अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे योग्य असल्यास वारसाची जमिनीच्या सातबारावर नोंद केली जाते.

तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Satbara boja now Online

Satbara boja now Online

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली, ई चावडी अशी संकेतस्थळे विकसित केली आहे. या संकेतस्थळांच्या मदतीन शेतकरी घरबसल्या 8 प्रकारची जमिन विषयक कामे करु शकतात.Satbara boja now Online

  1. वारसाची नोंद करणे.                               
  2. ई – करार नोंदणी
  3. जमिनीच्या सात बारा मधील चूक दुरुस्त करणे
  4. बोजा चढविणे किंवा बोजा कमी करणे.
  5. मयत व्यक्तीचे नाव कमी करणे                        
  6. अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
  7. एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे        
  8. विश्वस्तांचे नाव बदलणे

तुमच्या सातबारावर वारस नोंद ऑनलाईन करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

वारस नोंद म्हणजे नेमके काय?

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेत जमीन किंवा इतर मालमत्ता असते व दुर्दैवाने अशा व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती जमीन मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आतमध्ये वारस नोंदणीसाठी अर्ज करणे गरजेचे असते.

यामध्ये एखाद्या मालमत्ता धारकाचा जर मृत्यू झाला तर मृत झालेल्या व्यक्तीची विधवा, मृताचा विधुर पती, मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी आणि मृताची आई  हे व्यक्ती त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा वारस म्हणून उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा अधिकृत प्रमाणपत्राकरिता अर्ज करू शकतात.

तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

वारस नोंद करण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

वारस नोंदी करिता वैध माहितीसह फॉर्म भरणे गरजेचे असून घर नोंदणी प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा, न्यायालयीन शिक्का, रेशन कार्ड, वारसांचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्ती जर सरकारी सेवेमध्ये कार्यरत असेल तर सेवा नियमावली आणि सेवा आयोगाच्या सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आवश्यक असते.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 5000 रुपये शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 5000 रुपये शिष्यवृत्ती

उच्च प्राथमिक शिक्षणामधून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या ...
पुढे वाचा
जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज करा.

जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज करा.

जमीन अनुदान योजनेचा अर्ज PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन ...
पुढे वाचा
तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा | weather report of  Maharashtra districts

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा | weather report of Maharashtra districts

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा या हवामान अंदाज च्या पेजवर ...
पुढे वाचा
कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

सोप्या पद्धतीने कोटक बँकेत खाते काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया ...
पुढे वाचा
1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

सोलर पॅनल तुमच्या घरासाठी स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग ...
पुढे वाचा
मुलींच्या शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण फी माफ |राज्य सरकारची मोठी घोषणा.

मुलींच्या शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण फी माफ |राज्य सरकारची मोठी घोषणा.

मुलींच्या उच्च शिक्षणाच्यादृष्टीने राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ...
पुढे वाचा
शेती ची जमीन खरेदी करताना या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. | Important tips for buy new agriculture land.

शेती ची जमीन खरेदी करताना या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. | Important tips for buy new agriculture land.

शेतजमीन विकत घेताना आमची फसवणूक झाली. जमिनीचा मूळ मालक वेगळाच ...
पुढे वाचा
WhatsApp पेमेंट फीचर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या UPI वर आधारित आहे. व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही फोन नंबरवर किंवा कोणताही UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. इतर पेमेंट अॅप्सप्रमाणेच त्यावर पैशांच्या व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाहीत. WhatsApp द्वारे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे आपलं बँक खातं अॅड करावं लागेल. आज आम्ही तुम्हाला हे कसं करायचं, ते सांगणार आहोत.

Whatsapp Pay : upi द्वारे कोणालाही WhatsApp वरून पैसे पाठवा; अशी आहे प्रोसेस, पाहा स्टेप्स

घरच्यांना पैसे पाठवायचे असोत, तुमच्या मावशीच्या बर्थडे गिफ्टसाठी कॉन्ट्रिब्युशन द्यायचे ...
पुढे वाचा
आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇 अर्ज ...
पुढे वाचा

Leave a Comment